काही कविता केवळ अलौकिक असतात. त्यातिलच ही एकः
जयशन्कर प्रसाद यान्ची शब्दरचना , आशा भोसले यान्चा सुम्॑धुर आवाज आणि जयदेव साहेबान्चे अप्रतिम सन्गीत यामुळे ही कविता हिन्दि भाषेला एका वेगळ्याच उंचीवर पोहोचवते. ही कविता आणि मला उमगलेला तिचा भावार्थ देत आहे.
तुमुल कोलाहल कलह में, मैं हृदय की बात रे मन |
विफल होकर नित्य चंचल,
खोजती जब नींद के पल,
चेतना थक सी रही तब, मैं मलय की बात रे मन |
चिर विषाद विलीन मन की,
इस व्यथा के तिमिर वन की,
मैं उषा-सी ज्योति रेखा, कुसुम विकसित प्रात रे मन |
जहां मरू-ज्वाला धधकती,
चातकी कन को तरसती,
उन्हीं जीवन घाटियों की, मैं सरस बरसात रे मन |
पवन के प्राचीर में रुक,
जला जीवन जी रहा झुक,
इस झुलसते विश्व दिन की, मैं कुसुम ऋतु रात रे मन |
चिर निराशा नीरधर से,
प्रतिच्छायित अश्रु-सर से,
मधुप मुख मकरंद मुकुलित, मैं सजल जलजात रे मन |
ही कविता म्हणजे एका अशा सकारात्मक भावनेचे आत्मवृत्त आहे जी आपल्याला या जगातील सुन्न करणार्या घटनांना विसरून नव्याने जगण्याची उमेद देते.
_______________________________________________________________________________________
मी मनाच्या कोलाहलात आकंठ बुडालेल्या तुझी एक हळुवार समजूत काढणारी सखी आहे.
अपयशामुळे आणि कष्टामुळे थकलेल्या शरीराला जेव्हा झोपेची नितांत आवश्यकता असते त्यावेळची मी हळुवार सुंदर वाऱ्याची झुळुक आहे
व्यथेने गांजलेले मन जेव्हा अंधारात चाचपडत असते तेचा मी अचानक होणारी सुंदर फुलांची सुंदर पहाट आहे
वाळवंटातील धगधगत्या उन्हात तहानेने व्याकुळ होत असताना झालेली मी एक सुंदर बरसात आहे.
अशाच उन्हात जीवन जळत असताना या कठीण दिवसात अचानक होणारी मी एक गारवा देणारी सुंदर रात्र आहे.
______________________________________________________________________________________
हे गाणे ऐकत असताना एक्या वेगळ्याच जगात जातो आपण. शेवटच्या ओळीत अनुप्रास अलंकार वापरला आहे.
खरच हे गाणे ऐकताना कवी, गायिका,आणि संगीतकार यांच्या प्रतिभेचा सुंदर मिलाफ आपल्या थक्क करून टाकेल
आंतरजालावर या कवितेची फीत आपल्याला सहज मिळेल.